शुक्रवार, २४ मे, २०१३

हाय बापू तुमचा देश

हाय बापू तुमचा देश

बरोबर २००९ मध्ये  महात्मा गांधीच्या काही महत्त्वाच्या वापरलेल्या वस्तुंचा लिलाव झाला होता. त्यावेळी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी काही वस्तू खरेदी केल्या. आणि देशाची इभ्रत वाचविली. महात्मा गांधी हे देशाचे महान पुढारी. अहिंसेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ती झगडले हा सारा इतिहास पुन्हा सांगण्याची गरज नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या अग्रणीने आपल्या वर्तनाने काही आदर्शही निर्माण केले. अशा बापूंचे साबरमती, मुंबई, पुणे आणि अगदी, लंडन -आफ्रिकेमध्ये वास्तव्य होते.. तेथे -तेथे त्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वस्तू वापरल्या. 
त्यांनी वापरलेल्या वस्तूंना मरणोत्तर भाव येणे हे स्वाभाविक आहे. त्यांचा जाहीर लिलाव होतो. तो लिलाव कोणी तरी अवैध मार्गाने मिळवलेल्या संपत्तीच्या जोरावर मिरवण्यासाठी महापुरूषांच्या, त्यांनी वापरलेल्या वस्तू लिलावात खरेदी करण्याचा प्रघात आहे.अलिकडे गांधीजींच्या वस्तुंमध्ये त्यांनी वापरलेली शाल, त्यांच्या हस्ताक्षरातील गुजराती भाषेतील इच्छापत्र अशा काही वस्तूंचा लिलाव करण्यात आला. त्यांना काही कोटींचा भाव मिळाला. 
गांधी हे महात्मे . भारतीची संपत्ती. त्यांच्या विचारांचे अनुकरण नसेल पण वेळोवेळी त्यांच्या नावाचा वापर सारेच गांधीवादी करतात. गांधींजींना राष्ट्रपिता म्हणायचे, त्यांच्या नावांनी सत्ता मिळवाची. पोळ्या भाजून घ्यायच्या. एवढेच काय भारतीय चलन त्यांच्या छबीशिवाय चालत नाही. ज्यांच्या छबींनी-नोटांनी आर्थिक विनियम होतो. त्या गांधीजींच्या त्यांनी वापरलेल्या वस्तुंचा देशाबाहेर लिलाव होता. त्या वस्तू आपल्या खाजगी संग्रह आणि मिरवण्यासाठी घेतात. पण पुरोगामीपणाचा गांधीचा देश म्हणून मिरवणा-या सत्ताधारी, राजकारणी आणि केंद्र सरकार  यांना या लिलाव प्रक्रियेत भाग घेवून आपल्या राष्ट्रपित्याच्या महत्त्वाच्या वस्तु देशात आणता येत नाहीत. हा केवढा दुर्दैवाचा भाग आहे. गांधीच्या नावे राजकारण आणि सत्ता मिळवता येते. पण त्यांच्या चीज वस्तू आणण्याची धमक कॉंग्रेस सरकारच्यात धमक नाही हेच या लिलावातून दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: