बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

राहुलबाबा खरे बोलला ओ....

2014 मधे देशाचा भावी पंतप्रधान कोण? हा  प्रश्न भारतीय जनता पक्षाने अगोदरच सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. नमो नम आणि गुजरातचे विकासपुरूष नव्हे विनाशपुरूष नरेंद्र मोदी आहेत ( असे भाजपाच्या परतून आलेल्या नेत्या  उमा भारती म्हणालेल्या आहेत) . अर्थात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे त्या कृष्ण लीला करीत आड- वाणी करीत आड आले. त्याला तोड नाही. सगळे भोग- पदे भोगलेले अडवाणी मोदींच्या आड येवून त्यांनी त्यांना शकून करण्याचा प्रयत्न केला. पण भाजपाच्या राजाने त्यांची समजूत काढली. तरी ही अनी-बनी संपलेली नाही. ती कधीही आणी-बाणी रूप घेवू शकते. हे एकूण लालजींच्या वर्तनावरून वाटते.  हे एकीकडचे चित्र आहे.
दुसरीकडे कॉंग्रेसमध्ये गांधी घरण्याचा वारसच वारसा हक्काने पुन्हा राहुलबाबांच्या रूपाने देशाचा पंतप्रधान म्हणून जाहीर होण्याची शक्यता आता मूळ धरू लागली आहे. कॉंग्रेसमधील लाचार नेते आपली जहागीरी शाबूत ठेवण्यासाठी लवकर त्यावर शिक्कामोर्तब करतील. राहुलबाबांच्या पावलांवर पावले ठेवत प्रियंकाबेबी पण कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या जबाबदारीवर येण्याची शक्यता आहे.
राहूलबाबांनी पंतप्रधान मनमोहन सिंग परदेशात असताना देवरांच्या मिलिंदाकरवी लोकप्रतिनिधींना वाचविणा-या अध्यादेशाबाबत विरोधी टिवटीव केली होती. त्यावेळी अनेकांनी भुवय्या उंचावल्या. देवरांची काही खैर नाही असे काहींना वाटले. मात्र या टीवटीवित राहुलांचे पुढचे काव-काव सुरू झाले. त्यावरून राहुल ब्रिगेड आता किती सक्रीय झाली आहे. याचा अंदाज यावा.
राहुल गांधींनी लोकप्रतिनिधीना वाचविण्यासाठी आणल्या गेलेल्या वटहुकुमाला नॉनसेन्स करून सरकारला तो मागे घ्यायला लावून कॉग्रेसमधील भुतावळ आणि घटक पक्षांची पॉवर गुल केली आहे. राहुलबाबांचा हा एक निर्णय देश पातळीवर कलाटणी देणारा ठरणार आहे. राहुलबाबांच्या कृतीने आता कॉंग्रेस अंतर्गतही लगाम घालण्याचे धाडस त्यांनी करून एका दगडात किती तरी जणांना त्यांनी गारद केले आहे. त्यामुळे कोणी किती काही म्हणो-राहुलबाबा खरे बोलला ओ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: